शनिवार, ८ मे, २०१०

कसाबला फाशी आणि सकाळचा चंपक अग्रलेख...

    कसाबला फाशी झाली. दोन दिवस झाले. समाजाची स्मरणशक्ती तशी कमी असतेच म्हणा. थोड्याफार दिवसांची गोष्ट आणि कुणाच्या हे लक्षातही राहणार नाही. मला मात्र सकाळमध्ये जो अग्रलेख प्रसिद्ध झाला तो वाचून हसावे की रडावे हे कळेनासे झाले आहे.
    बकवास शीर्षकापासूनच याची सुरूवात झाली आहे. "कसाबचा झाला; आता इतरांचाही करा हिसाब"
कसाब काय हिसाब काय? यमकाचा हा कसला फालतू अट्टहास?

    पण पुढे आख्खा अग्रलेखच इतक्या हास्यास्पद विधानांनी भरलेला आहे की शीर्षकाचे काहीच वाटायला नको. सुरुवातीचा भाग ठीक आहे. पण पुढेपुढे असली नमुनेदार विधानं केली आहेत ती बघण्यासारखी आहेत.
    "कसाब जिवंत हाती लागला त्यामुळे भारतातील अतिरेकी कारवायांमधील पाकिस्तानचा हात स्पष्ट झाला." - हे आधीही स्पष्ट झालेलं आहे, त्याने पाकिस्तानला काय फरक पडला? पाकिस्तानवर कुणी कारवाई केली आहे काय?

    "कसाब पकडला गेल्यामुळे पाकिस्तानला नाटक म्हणून का होईना, पण मुंबईतील अतिरेकी हल्ल्यांसंबंधीचा खटला चालवावा लागला." - याच्यातून काय निष्पन्न झाले? कुणाला शिक्षा झाली?

    "दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या टाइम्स स्क्वेअरमधे बॉंब ठेवताना पकडल्या गेलेल्या फैजलने आपण पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवाया करण्यासाठी आल्याचे कबूल केल्याने महासत्तेला आता पाकिस्तानविरुद्ध डोळ्यांवर कातडे पांघरुन स्वस्थ बसणे शक्य होणार नाही." - अमेरिका? पाकिस्तानवर कारवाई? पाकला मध्येच आठवण आली की सज्जड दम, तंबी वगैरे देणे आणि दरवेळेस डॉलर्सच्या मदतीचा ओघ वाढवणे यापेक्षा अमेरिका दुसरे काहीही करत नाही. आता तुम्ही बरे झाले सांगितले. अमेरिका नक्कीच धोरणात बदल करेल.

    "वरच्या न्यायालयांमध्ये कसाबला झालेल्या शिक्षेची जसजशी शहानिशा होईल, तसतसे पाकिस्तानला अतिरेकी कारवायांशी असलेला आपला संबंध नाकारणे जड जाईल." - खी: खी: खी:

    "१९९३ च्या बॉंबस्फोट खटल्यापेक्षा कसाबचा खटला वेगाने चालला आणि त्यातील साक्षीपुराव्यांनुसार आरोपीला कठोर शिक्षा केल्याने भारताचा याबाबतीतील कठोरपणाही जगासमोर आला." - कुठे आहे हा कठोरपणा? आम्हाला कसा दिसला नाही अजून? काही ठराविक व्यक्तींनाच दिसतो काय? म्हणजे तुम्ही बॉंबस्फोट करा, शेदोनशे माणसं मारा आणि आम्ही त्याचा लवकर खटला चालवतो आणि त्यांना कठोर शिक्षा करतो. बकवास!

    "भारत हा अतिरेकी कारवायांसाठी कायमचा बकरा बनणार नाही हेही या निकालाने अतिरेकी कारवायांना पाठीशी घालणार्‍या आणि पाठबळ पुरवणार्‍या शेजारी देशांनी लक्षात घेतलेले बरे." - खी:खी: खी:! त्यांनी लक्षात घेतले आहे. तसे सांगणारा इमेल मला कालच आला. पण मग तरीही पुण्यातले बॉंबस्फोट कुणी केले बरे?

    "भारतीय न्यायव्यवस्थेवर असलेला आमचा विश्वास या निकालाने आणखी दृढमुल झाला अशी भावना अनेकांनी ठामपणे बोलून दाखवली." भारत हा एक मूर्ख लोकांचा देश आहे. कोण आहेत हे लोक? त्यांचा पत्ता तरी द्या. अरे अफजल गुरुच आता फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये २२ व्या नंबरला आहे. त्याला अजून शिक्षा नाही. आणि कसाबचं काय घेऊन बसलाय? मला तर असं वाटतंय की एखाद्याचा खून करुन फाशीची शिक्षा घेऊन बसावं. बरीच वर्षे आरामशीरपणे काढता येतील. पोटापाण्याची चिंता करायची कारण नाही. या काळात उत्तमोत्तम ग्रंथ वाचावेत, टिपणं काढावीत, लिखाण करावं. एकूणातच चिंतन, मनन करत आयुष्य घालवावं. कसला आला आहे पश्चात्ताप?

    "देशद्रोही कसाबला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आनंद व्यक्त करणारे, मिठाई वाटणारे मुस्लिम समाजातलेही नागरिक होते, ही देशफोड्या अतिरेक्यांना भारतीयांनी लगावलेली सणसणीत चपराक आहे." - ही असली वाक्यं लिहणारा कोण आहे? संपादक की बुजगावणं? कुठल्या जगात वावरता आहात तुम्ही? चपराक? चपराकचा अर्थ कळतो का तुम्हाला? साधं या अतिरेक्यांच्या यावनी दाढीलाही भारताला अजून हात लावता आलेला नाही आणि चपराक कशाची डोंबलाची? स्वत:ची पाठ थोपटायची तरी किती? या असल्या पुचाट विधानांनी स्वत:ची समजूत किती दिवस काढणार?

    एकंदरीत एखाद्या बुजगावण्याने हा अग्रलेख लिहलाय असेच मला तरी वाटत आहे. केवळ आणि केवळ जाहिरातींच्या मागे लागलेल्या आणि वर्षभर खरेदीची फालतू प्रदर्शने भरविणार्‍या सकाळने हे असले बकवास अग्रलेख लिहावेत तरी कशाला? तुम्हाला जर सरकारला कडक शब्दात सुनावता येत नसेल, जाब विचारता येत नसेल तर त्यापेक्षा वसंत संपात कधी येतो, सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम कधी करावा? आणि अधिक मास कधी येतो, त्यात काय काय करावे हीच चर्चा चालू राहू द्या की! कसे?

३ टिप्पण्या:

  1. Khee..khee..khee.... :)
    BHaarrii.... attuttam vivechan....!!!
    असल्या पुचाट विधानांनी स्वत:ची समजूत किती दिवस काढणार? kharey...agdi khare....
    svataachya manaachi samjoot kadhane evdhech karato aapan aani aapale sarkaar...
    Kasaba la jhaleli shikshechi sunavani hi suddha sarkaar ne kadhaleli ashich ek puchat samjoot aahe....

    उत्तर द्याहटवा
  2. सकाळचे संपादक संवेदनशील मनाचे आहेत. त्यांना अशा घटनांवर भाष्य करणे जरा जड जाणारच. कसे?

    उत्तर द्याहटवा
  3. मैथिली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

    अनामितराव, अहो संवेदनशील मनाचे असतील तर त्यांच्यावर अजूनच परिणाम झाला पाहिजे. त्यांनी अजूनच जहाल भाषा वापरली पाहिजे. हो की नाही? उलट त्यांना काहीच फरक पडत नाही वाटतं.

    उत्तर द्याहटवा